प्रिय....
प्रिय .......!!!!! हा शब्द जरा चुकीचा वाटतो ना आपल्यामधे.......!!!! पण जाउ दे हा वाद संपायला कुठून तरी सुरवात करायचीये ना.....
साही ना काहीतरी सुरू होते ते फक़त संपन्यासाठीच...... नि कधी संपते हे कळत पण नाही......
आणि आपले पण संपले ना बघ.......
काही बोलू का मी??
तू नाही बोलली तरी मे बोलणारच आहे त्यामुळे हा प्रश्न चुकीचा आहे.........
जऔ दे सरळच बोलतो ना..........
प्रत्येकाच्या मनात एक कप्पा असतो. जिथ खुप काही कळत न कळत साठलेलं असतं, एखादी व्यक्ती, एखादं गाणं, एखादा स्पर्श, एखादा हर्ष, एखादा गंध, एखादा छंद, तसं एखादा चुकलेला श्वास तर कधी कधी ’कहीतरी’ हरवलेलंही तिथं सापडतं. त्याला आपण आठवणींचा कप्पा म्हणतो. अश्या या आठवणींच्या कप्प्यात आयुष्यातले काही अविस्मरणीय क्षण ही घर करुन असतात, ते ’आठवणींतले क्षण’ ! कधी सुखद तर कधी दुखद पुन:प्रत्ययाने डोळ्यांच्या पापण्यांना भिजवणारे... तरीही मनाला हवे हवे असणारे... असे क्षण जे आपल्याला आपलं आवडतं गाणं ऐकवतात... दुरावलेल्या व्यक्तीशीही भेट घडवतात... आवडणा-या स्पर्शाचा - गंधाचा अनुभव देतात... अन एखादा श्वास पुन्हा चुकवतात. माझ्या आयुष्यातले असे काही ’आठवणींतले क्षण’ आहे. थोडीशी हुरहुर थोडीशी तळमळ, तरी सत्यामधे राहुन स्वप्नांमधे हरवतंय मन, आठवतो जेव्हा मी, माझ्या "आठवणींतले क्षण".
पण कधी कधी काही क्षण इतक्या यातना देऊन जातात की ते क्षण पुन्हा आठवणीत नको असे वाटते, आपलीच वाटणारी माणसे अचानक आपल्यापासून दुरवतात, कधी स्वप्नात सुधा ज्या गोष्टीचा विचार केलेला नसतो अशा गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात ती माणूस एकदम हाताश् होऊन जातो. सार जगच आपल्या विरूध्ध जाताय अस वाटायला लागते. मी तुझीच आहे रे अस म्हनणारी अचानक एक दिवशी म्हणते की "विसरून जा मला", हृदयावर असंख्य घाव करणारे ते शब्द इतक्या सहजपणे कशी ती बोलू शकते, माझ्याच वाटेला का एवढे दुख, काय केलाय मी? की काहीच न केल्याची ही शिक्षा भोगतो आहे मी.....
तिच्या पासून दूर जाण्याच्या विचाराने सुध्दा जीव कासावीस व्हायचा माझा. नि आता तर ती माझ्या आयुष्याटच नाहीए मग मझा जगून काय उपयोग, मग सरळ मारुनच जाउ ना? मग सर्व सोपे होऊन जाईन. कसलाच त्रास नाही,
पुन्हा सर्व नव्याने सुरू होईल, नवीन आयुष्य मिळेल, नवे शरीर, नवे स्वप्न........म्हणजे नवीन जीवनच मिळेल मला.......
पण मारुन पुन्हा आयुष्य सुरू करण्यापेक्षा आताच्याच आयुष्यात नवीन सुरवात केली तर, एक माणूस आयुष्यातून गेल्यावर आयुष्य संपत नसते, थोडीशी पोकळी निर्माण होईल पण थोड्या काळाने ती पण भरून जाईल. वेळ मोठ्या मोठ्या जखमा भरून काढते माझा तर छोटासा ओराखडा आहे होईल सर्व ठीक.......
ज्या माणसाने माझ्या प्रेमाचा अपमान केला, माझ्या भावनाशी खेळला त्या माणसाला काहीच एक हक़क़ नाहीए माझ्या आयुष्यात परत येण्याचा, उरलेले आयुष्य तिच्या आठवानीच्या, तिच्या सोबत घालवलेल्या क्षणाना कवटाळुन, तिच्या स्पर्शाच्या, तिच्या नाजूक हसण्याच्या तिच्या प्रत्येक अशा गोष्टींवर ज्या मला हव्या हव्याश्या वाटायच्या त्यांच्या आधारे मी घालवेन, पण पुन्हा तिच्या आयुष्यात पाउल ठेवणार नाही.....
आतापासून हे आयुष्य फक्त माझे आहे नि फक्त माझेच असणार........
लकी......
{नाव पण जरा चुकीचेच वाटते ना....}