गजरा
दव बिन्दुत भावना,माझ्यासारखिच तुला असावी हे काय जरुरी आहे?,
खरच,प्रेमाची वाट पहावी लागणं,हि उच्चांकाची सबुरी आहे,
मोहरलेल्या अंतरंगान, घरट्यात पाउल वळाव,खरं का हीच प्रीती आहे?,
मन जरी शेवाळल असलं तरी,पाया खाली सरकणारी रेतीच आहे,
सांगितलेलं काम विसरलो,जाउदे मी तसाच आहे,
मुठी आणलेला गजरा कोमेजला ग,पण हाती सुगंध तसाच आहे.
चारुदत्त अघोर.